मुंबई : राज्यात सध्या बदल्यांचे वारे वाहत असून, टप्प्या-टप्प्याने अधिकाऱ्यांच्या आदेश निघत आहेत. दरवर्षी मे महिन्यात बदल्या होत असतात. आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली तर काहींच्या बदल्या झाल्या. तीन वर्षाचा एकाच ठिकाणी कार्यकाळ पुर्ण करणाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात मंत्रालयातील आणि राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officers Transferred in Maharashtra) पुढील आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.