नांदेड आणि लातूरकर कोणाच्या मांडीवर बसणार?  

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांना सांधला काँग्रेस नेत्यांवर निशाना

नांदेड : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचे (Eknath Shinde Govt) भवितव्य 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर अवलंबून आहे. हे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर (Congress politics of Nanded and Latur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टिका अ‍ॅड. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Adv.Balasaheb Ambedkar) यांनी केली आहे. 

शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत, असे खळबळ उडवून देणारे वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. खैरे यांचा धागा पकडून अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री  शोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Ad. Balasaheb Ambedkar was targeted on the Congress leader)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर पुढे काय होऊ शकते, याबाबत अनेक नेते अंदाज वर्तवत आहेत. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वात आधी काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी खैरेंचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर टीका केली.  16 आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टिका केली आहे. (Ad. Balasaheb Ambedkar was targeted on the Congress leader)

 

 

अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या आणि देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट देखील झाली आहे. ही भेट भाजप प्रवेशासाठीच असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावर मी कुठेही जाणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. त्यातच खैरे आणि अ‍ॅड. आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Ad. Balasaheb Ambedkar was targeted on the Congress leader)

 

खासगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा भारत जोडोचा उपक्रम चांगला आहे. परंतु, यातून फारसे काही हाती लागेल असे वाटत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले असून, त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नाही. सध्याचे सरकार हे लुटारूंचे असून, हे राहुल गांधींनी म्हणायला शिकलं पाहिजे. पण काँग्रेसी मंडळी हे सर्व मांडू शकत नाहीत. कारण तेही यात एकेकाळी तेच सहभागी होते. देशात खासगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झाले, असा आरोप केला आहे.
Local ad 1