“आम्ही न या कागदात मोडतो न त्या कागदात” |”We don’t break into this paper.”

नांदेड : आधार काढायला जावे तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायतीचा दाखला लागेल. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे, अशा शब्दात तृतीयपंथी गौरीने (Transgender gouri) भावना व्यक्त केल्या आहेत. “We don’t break into this paper.

 

नांदेड जिल्हा प्रशासनाने तृतीयपंथीयांसाठी थेट घरी जाऊन लसीकरण केले. त्यावेळी गौरीने आपल्या भवना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंह संधु, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन उपस्थित होते.

 

माझ्यासारख्या अनेक गौरी आणि त्यांचे दु:ख सारखेच आहे. हे पाहून आम्हाला आता याचे कुणालाच काही वाटत नाही. समाज आम्हाला काही कमी करतो, अशातला भाग नाही. आमच्या वेदना घेवून आम्ही जगतो. एकमेकींचे मन आम्ही एकमेकीना बिनधास्त लाखोळी वाहूनही हलके करुन घेतो. समाज जे काही म्हणायचे आहे, ते आम्हाला म्हणत राहतो, त्यामूळे आम्ही त्यांची फारशी पर्वाही करत नाही. वारंवार शल्य मात्र एकाच गोष्टीचे राहते ते म्हणजे सरकार दप्तरी आवश्यक असणारी आमची ओळख !, अशी खंतही गौरीने व्यक्त केली. “We don’t break into this paper.”

 

मला विविध सणांसह गणपतीची खूप आवड. एक छोटा गणपती मी असाच एका दुकानदाराकडून मागून घेतला. विकत नाही. आम्ही थोडीच काही विकत घेतो ? या गणपतीमुळे मला कुणीतरी गौरी असे नाव दिले. मलाही हे नाव सगळया नावापेक्षा जास्त भावले. तेंव्हापासून मग मी गौरी झाले. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने समाज आणि किन्नर यातील एक-एक पदर गौरी उलगडून दाखवत होती. “We don’t break into this paper.”

 

अनेक वर्षे झेलेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक अश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या साऱ्या व्यथा आम्ही घेवून भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले. साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते.

 

शासनाने तृतीयपंथी तक्रार निवारण समिती नेमल्यामूळे आम्हाला आमच्या भावना मांडता आल्या. याचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वसतीत येवून दिला. याबद्दल गौरी विशेष आभार मानायला विसरली नाही.

 

यावेळी गौरी शानुर बकश यांनी प्रशासनाचे आभार मानले. या लसीकरण कॅम्पच्या यशस्वीतेसाठी अर्चना शानूर बकश, रेश्मा बकश, शेजल बकश, दिपा बकश, कमल फाउडेशनचे अध्यक्ष अमरदिप दिगंबर गोधने, समाजकल्याण विभागाचे दिनेश दवणे, कैलास राठोड यांनी प्रयत्न केले. “We don’t break into this paper.”

Local ad 1